वालभट नदी

वालभट नदी
वालभट नदीचा धबधबा. नागरी निवारा वसाहत, गोरेगाव (पूर्व) , मुंबई. Waterfall on Walbhat River. Near NNP colony, Goregaon (East) , Mumbai.

Monday, 17 April 2017



अतिक्रमणांनी अडवले ‘ब्रिमस्टोवॅड‘ 


सकाळ वृत्तसेवा

मंगळवार, 26 जुलै 2016

************************
मुंबईतील 26 जुलैच्या (2005) जलप्रलयाचे प्रमुख कारण ठरलेल्या मिठी नदीच्या महापुराला मंगळवारी तब्बल 11 वर्षे होत आहेत. 
मिठीसह अन्य लहान-मोठ्या नदी-नाल्यांची पावसाचे पाणी वाहून नेण्याची, तसेच समुद्रातील भरतीच्या पाण्याची साठवण क्षमता वाढवली असली तरी आजही नागरिकांच्या मनातील मिठीचा धाक कायम आहे. 


"ब्रिमस्टोवॅड‘ प्रकल्पातील कामांमुळे 50 मिलिमीटर पावसाचे पाणी नदी-नाल्यांतून वाहून जाऊ शकते. 

साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पाच "पम्पिंग स्टेशन्स‘ सुरू झाली असून, तीन प्रगतिपथावर आहेत. एरवी दोन-दोन दिवस साचून राहणाऱ्या पुराच्या पाण्याचा यंदा दोन-तीन तासांत निचरा झाला. 

नालेसफाई आणि रुंदीकरण-खोलीकरणाच्या कामांत महापालिकेला चुना लावणाऱ्या कंत्राटदार आणि अभियंत्यांना आयुक्तांनी कारवाईचा दणका दिला. 

तथापि, नद्या-नाल्यांलगतच्या अतिक्रमणांनी "ब्रिमस्टोवॅड‘ अडवल्याने 26 जुलैचा धोका पूर्णत: संपलेला नाही.

मिठी नदीच्या महापुराला तब्बल 11 वर्षे झाली. अजूनही त्याच्या आठवणींनी मुंबईचे नागरिक अस्वस्थ होतात. गेल्या वर्षी सुमारे 450 साडेचारशे मिलिमीटर पाऊस झाला आणि "26 जुलै‘ची भीती जागी झाली. 

त्या जलप्रलयाच्या वेळी तब्बल 944 मिलिमीटर पाऊस झाला होता. 

गेल्या वर्षी मिठी नदी पातळी ओलांडण्यासाठी फक्त एक मीटरने कमी पडली होती. त्या तुलनेत यंदा पाऊस कमी आहे. "मिठी‘ची दहशत कमी झाली असली तरी धाक कायम आहे.



- विष्णू सोनवणे 


No comments:

Post a Comment

BMC will head survey to identify PAPs for Brimstowad project

  In what could speed up crucial river widening works under the Brihanmumbai  Municipal Corporation's (BMC) ambitious Brihanmumba...